राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाचा इशारा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. काल कोकणात सर्वत्र, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात कोकण आणि विदर्भात सर्वत्र तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. मराठवाड्यात मात्र पावसाची हजेरी तुरळक ठिकाणीच होती. सकाळपर्यंतच्या २४ तासात राज्यात सर्वाधिक गडचिरोलीत १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर त्या खालोखाल ८० मिलिमीटर पावसाची नोंद पुण्यात झाली. आजही राज्यात पावसाचा जोर काहीसा असाच राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या दोन दिवसात मराठवाड्यातही सर्वत्र पाऊस अपेक्षित आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image