औरंगाबाद जिल्ह्यात विविध विकास कामं वेगानं पूर्ण करा - उद्धव ठाकरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांचं सादरीकरण काल त्यांच्यासमोर करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. राज्याच्या संस्कृतीचं प्रतिक असणाऱ्या संत श्री एकनाथ महाराज संतपीठात अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून, हा मार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल, असं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या १४४ शाळांच्या इमारतींची पुनर्बांधणी आणि दुरूस्तीचा शाश्वत कार्यक्रम हाती घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणाची ३८२ कोटी रुपयांची आणि शहरातल्या विविध मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाची ३१७ कोटी २२ लाख रूपयांची कामं महाराष्ट्र नगरोत्थान निधीतून पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगानं करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image