राज्यात बुधवारी ४ हजार १५५ रुग्ण बरे

 

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ४ हजार १५५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ४ हजार १७४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ६५ रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ९७ हजार ८७२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६३ लाख ८ हजार ४९१ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३७ हजार ९६२ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ४७ हजार ८८० ॲक्टिव रुग्ण आहेत. धुळे जिल्ह्यात सध्या एकही रुग्ण नाही. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ९ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांशटक्के आहे.