टोकियो पॅरालिंपिक्समधील विजयी खेळाडूंचा रोख बक्षिसांद्वारे गौरव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी आज भारतीय पॅरालिम्पिक्स खेळाडूंची आणि पदक विजेत्यांची भेट घेऊन त्यांना सन्मानित केलं. त्यांनी या खेळाडूंच्या प्रशिक्षकांचंही अभिनंदन केले. सुवर्ण पदक विजेत्यांना १० लाख रुपये रोख, रौप्य पदक विजेत्यांना ८ लाख रुपये रोख, आणि कास्य पदक विजेत्यांना ५ लाख रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आलं. सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताने आतापर्यंत ५४ क्रीडापटूनचा चमू पाठविला होता. या स्पर्धेत १९ पदकं जिंकून भारतीय पॅरालिम्पियन्सनी  इतिहास घडविला.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image