राज्यात आतापर्यंत ६३ लाख २८ हजार ५६१ रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ८४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ३९१ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख १८ हजार ५०२ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६३ लाख २८ हजार ५६१ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३८ हजार ४६९ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ४७ हजार ९१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ९ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.नांदेड जिल्ह्यात काल ३ रुग्ण कोरोना मुक्त झाले. काल जिल्ह्यात एकाही नवीन रुग्णाची नोंद नाही. सध्या २९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. परभणी जिल्ह्यात काल ३ नवीन रुग्ण आढळले सध्या जिल्ह्यात ११ रुग्ण उपचार घेत आहेत.सिंधुदुर्गात काल १४ रुग्ण बरे होऊन घरी गेले काल जिल्ह्यात ४१ नव्या रुग्णांची नोंद झाली सध्या जिल्ह्यात १ हजार ३८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.बुलडाणा जिल्ह्यात काल बरे झालेल्या ३ रुग्णांना सुट्टी दिली. काल जिल्ह्यात ४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या २८ रुग्ण उपचाराधीन आहेत.वाशीम जिल्ह्यात काल ३ रूग्णांनी कोरोना वर मात केले. काल जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला नाही. सध्या ५ रुग्णांवर उपचार सुरु घेत आहेत.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image