वर्धा नाव दुर्घटनेच्या शोधमोहिमेत आतापर्यंत १० जणांचे मृतदेह सापडले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यात श्री क्षेत्र झुंज इथं वर्धा नदीत नाव उलटून अकरा जण पाण्यात बुडाले होते,  त्यापैकी दहाजणांचे मृतदेह आता पर्यंत बचाव पथकाच्या हाती लागले आहेत. मंगळवारी तीन मृतदेह हाती लागले होते. इतरांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक सातत्यानं कार्यरत असून काल दिवसभरात काहीही हाती लागलं नाही. त्यामुळे आज पुन्हा पहाटेपासून बचाव कार्य सुरू झालं. NDRF, SDRF आणि DDRF च्या पथकांनी ही शोधमोहिम राबवली आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image