शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी बाल रक्षक भ्रमणध्वनी ऍपची निर्मिती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या गावी किंवा अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी टाटा ट्रस्ट आणि केंद्र सरकारच्या एससीईआरटी, अर्थात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने बाल रक्षक भ्रमणध्वनी ऍपची निर्मिती केली आहे. यातून स्थलांतरित, परराज्यातून आलेले, अनियमित विद्यार्थी, नव्याने सापडलेली मुले अशा चार प्रकारच्या मुलांची नोंद होणार आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर ही माहिती ॲपमध्ये एकत्रित उपलब्ध होईल. प्रायोगिक तत्त्वावर या ऍपची चाचणी बीड, नांदेड, अहमदनगर, कोल्हापूर आणि चंद्रपूर ह्या पाच जिल्ह्यात केली आहे. आता या महिन्यात राज्यभर या अॅपद्वारे चाचणी घेतली जाणार आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image