धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३८ हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : धुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ३८ हजार ५५ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले असून, ४७ हजार २३० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. खरीप हंगामामध्ये ९७ टक्के क्षेत्रावर म्हणजेच ३ लाख ९८ हजार ७२९ हेक्टरवर पेरणी झाली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीला सर्वाधिक फटका बसला असून, अनेक पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.कृषी आणि महसूल विभागानं नुकसानाचे पंचनामे केले असून, नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. 

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image