मुंबई उपनगरीय रेल्वेच्या फेऱ्या आजपासून पूर्ववत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईची जीवन वाहिनी असलेली उपनगरीय रेल्वे वाहतूक १४ महिन्यांच्या खंडानंतर सामान्य मुंबईकर प्रवाशांसाठी कालपासून सुरू झाली. कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करता येणार असल्यानं मुंबईकरांची मोठी सुविधा झाली आहे. सकाळी गर्दी थोडी कमी होती, मात्र दुपार नंतर गर्दी वाढायला लागली. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लोकल बंद झाल्या होत्या. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात केवळ मर्यादित स्वरूपात लोकल वाहातूक सुरु झाली होती. जवळपास दीड वर्षाच्या खंडा नंतर पुन्हा रेल्वेचा प्रवास करायला मिळाल्यामुळे अनेक प्रवाशांनी आनंद व्यक्त केला, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image