राज्यात काही जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म नियंत्रण क्षेत्र तयार करण्याची गरज- डॉ. भारती पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे, त्या जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म नियंत्रण क्षेत्र तयार करण्याची गरज असल्याचं मत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या ‘जनआशीर्वाद’ यात्रेदरम्यान त्या काल नंदुरबारमध्ये बोलत होत्या. प्राणवायू अभावी कोरोना विषाणू बाधित किती रुग्णांचा मृत्यू झाला, याबाबत राज्याकडून केंद्राला अद्याप माहिती मिळालेली नसल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसींच्या सर्वाधिक मात्रा महाराष्ट्राला देण्यात आल्या असून, राज्यातल्या एक लाख मात्रा वाया गेल्याचंही त्या म्हणाल्या.

 

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image