राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर किंचित घसरला, तर मृत्यूदर किंचित वाढला आहे. काल राज्यभरात ५ हजार ३१  नवे रुग्ण आढळले, ४ हजार ३८० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर २१६ रुग्णांचा मृत्यू झाला.राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ३७ हजार ६८० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६२ लाख ४७ हजार ४१४ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ३६ हजार ५७१ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ५० हजार १८३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ४ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image