भारत आणि चीन यांच्यातील मुख्य कमांडर स्तरावरील चर्चेची १२ वी फेरी मोल्दो येथे संपन्न

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन यांच्यातील मुख्य कमांडर स्तरावरील चर्चेची १२ वी फेरी काल मोल्दो इथे पार पडली. सुमारे ९ तास ही चर्चा चालली.

भारत आणि चीनकडून रात्री उशिरापर्यंत संयुक्त निवेदन जारी करण्यात आलेले नसले तरी या बैठकीत पूर्व लडाख सेक्टरमध्ये सुरू असलेला लष्करी अडथळा आणि तणाव कमी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. भारताने ३ महिन्यांनंतर झालेल्या बैठकीत हॉट स्प्रिंग्स आणि गोगरा हाइट्समधून माघार घेण्याचा चीनला आग्रह धरला आहे.

तर ११ व्या फेरीत भारताने पूर्व लडाखच्या डेपसांग मैदाने, गोगरा आणि हॉट स्प्रिंग्स भागातून सैन्याच्या विस्थापनासाठी आग्रह धरला होता, परंतु चीनने ते स्वीकारण्यास नकार दिला. तीन महिन्यांनंतर, चीनने १२ व्या फेरीसाठी २६ जुलैचा प्रस्ताव दिला, परंतु भारतीय सैन्याने त्याच दिवशी कारगिल विजय दिवस साजरा करत असल्याने भारताने बीजिंगला नवीन तारीख निश्चित करण्यास सांगितलं होते, त्यानुसार काल १२ वी फेरी पार पडली.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image