भारत आणि चीन यांच्यातील मुख्य कमांडर स्तरावरील चर्चेची १२ वी फेरी मोल्दो येथे संपन्न
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीन यांच्यातील मुख्य कमांडर स्तरावरील चर्चेची १२ वी फेरी काल मोल्दो इथे पार पडली. सुमारे ९ तास ही चर्चा चालली.
भारत आणि चीनकडून रात्री उशिरापर्यंत संयुक्त निवेदन जारी करण्यात आलेले नसले तरी या बैठकीत पूर्व लडाख सेक्टरमध्ये सुरू असलेला लष्करी अडथळा आणि तणाव कमी करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. भारताने ३ महिन्यांनंतर झालेल्या बैठकीत हॉट स्प्रिंग्स आणि गोगरा हाइट्समधून माघार घेण्याचा चीनला आग्रह धरला आहे.
तर ११ व्या फेरीत भारताने पूर्व लडाखच्या डेपसांग मैदाने, गोगरा आणि हॉट स्प्रिंग्स भागातून सैन्याच्या विस्थापनासाठी आग्रह धरला होता, परंतु चीनने ते स्वीकारण्यास नकार दिला. तीन महिन्यांनंतर, चीनने १२ व्या फेरीसाठी २६ जुलैचा प्रस्ताव दिला, परंतु भारतीय सैन्याने त्याच दिवशी कारगिल विजय दिवस साजरा करत असल्याने भारताने बीजिंगला नवीन तारीख निश्चित करण्यास सांगितलं होते, त्यानुसार काल १२ वी फेरी पार पडली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.