स्वातंत्र्यदिनापासून मुंबईत लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यदिनापासून मुंबईत लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेनं पूर्ण तयारी केली असून मुंबईतल्या ५३ स्थानकांवर ३५८ मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. पहिल्या सत्रात १८ हजार ३२४ नागरिकांचं पडताळणी पूर्ण झाली असून १७ हजार ७५८ जणांना मासिक पास देण्यात आले आहेत. महापौर किशोरी पेडणेकर आणि अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर जाऊन या मदतकेंद्रांचा आढावा घेतला. कोविड लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवसांनी या प्रवासासाठी पात्र होता येणार आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image