बी डी डी चाळीतल्या मूळ सदनिका धारकांना १०००रु आकारण्याचा राज्य सरकारचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत मूळ रहिवासी म्हणजेच सदनिकाधारकांना प्रति सदनिका एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय काल झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. पुनर्वसन सदनिकेचे करारनामे आणि दस्त यासाठी नाममात्र मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मुंबई विकास विभाग अर्थात बीडीडी तर्फे १९२१ ते १९२५ या काळात मुंबईत २०७ चाळी बांधण्यात आल्या. त्या आता मोडकळीला आल्यामुळे म्हाडातर्फे त्यांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. टाळेबंदीच्या काळात उत्पादन झालेली दूध भुकटी आणि बटर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदला वर्किंग स्टॉक म्हणून व्यवसायासाठी देण्याचा निर्णय कालच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image