राज्यात १ हजार १६४ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ५ कोटींपेक्षा जास्त थाळ्यांचं वाटप

 

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्य शासनाच्यावतीनं गरीब आणि गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं कळवलं आहे. राज्यात सध्या १ हजार १६४ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून या थाळ्यांचं वाटप केलं जातं. या केंद्रांमधून १५ एप्रिल ते ७ ऑगस्ट या काळात १ कोटी ७२ लाख ३२ हजार ६९५ मोफत थाळ्यांचं वितरण केलं गेलं. जुलै महिन्यात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी मोफत ९२ हजार १७ थाळ्याचं वाटप केलं गेलं अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image