मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट देत आहेत. राज्यपालांनी रागगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यामधल्या तळिये गावाला भेट देऊन त्यांनी दरड दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली तसंच बाधितांचं सांत्वनही केलं. बाधितांना अधिकाधिक मदत मिळवी यासाठी स्वतः प्रयत्न करु असं ते म्हणाले. राज्य आणि केंद्र सरकार मिळून दूर्घटनाग्रस्त आणि बाधितांचं लवकरात लवकर पुनर्वसन करतील, तसंच अधिकाधिक सुविधाही पुरवतील अशा शब्दांत त्यांनी नागरिकांना आश्वस्त केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.