मुख्यमंत्र्यांची तळीये गावाला भेट,दुर्घटनाग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या दुर्गम तळीये गावाला भेट देऊन पाहणी केली. या गावात शासन सर्वतोपरी मदत करेल, असे त्यांनी सागितले. मदत आणि पुर्नवसन विभागाने आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार पुरग्रस्त भागातून ९० हजार लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या पूरपरिस्थितीमुळे ७६ जणांचा मृत्यू झाला असून ३८ जण जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत. तर,३० जण बेपत्ता आहेत. रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या तळीये येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४६ तसेच पोलादपूर तालुक्यातल्या दुर्घटनेत ११ असे एकूण ५७ मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये १० वर्षाखालील ७ बालकांचा समावेश आहे. पोलादपूर इथला केवणाळे येथे ढिगाऱ्याखाली दबलेले ६ तसेच गोवेले सुतारवाडी इथले ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.साताऱ्यातल्या पाटण तालुक्यात आंबेघर इथे आपातकालीन पथक दाखल झाले असून आज सकाळी मातीखाली गाडलेले ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरड कोसळल्याने तसेच मृत झालेल्यांची संख्या आता १४ झाली आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image