बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ जणांचा मृत्यू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधील पूरपरिस्थितीमुळे २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश मृत्यू पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे झाले आहेत तर वीज अंगावर पडून ९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. चार जण सिवानमधील आणि रोहताश मधील २ जणांचा मृत्यू झाला. पुर्व रेल्वेच्या समस्तीपूर प्रभागाअंतर्गत येणाऱ्या सुगौली आणि मझौलिया स्थानकांदरम्यान असलेल्या बुरही रेल्वे रुळावर पुराचं पाणी आल्यानं ६ विशेष रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर १२ मार्गांवरील रेल्वे गाड्या इतर मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याचं रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांनी आकाशवाणीला सांगितलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image