भारतीय रेल्वेचा गेल्या सात वर्षांमधला प्रवास असंख्य परिवर्तनाचा होता - सुनीत शर्मा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेचा गेल्या सात वर्षांमधला प्रवास असंख्य परिवर्तनाचा होता असं भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांनी म्हटलं आहे. ते आज बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे तंत्रज्ञानाधारित बनवणं, यंत्रणांचं आधुनिकीकरण करणं आणि प्रवाशांना अधिकाधिक सुखकारक अनुभव देणं हे मंडळाचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. गांधी नगर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हे रेल्वे स्थानकं पुनर्विकास उपक्रमातलं पहिलं पाऊल असल्याचं ते म्हणाले. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन बाळगत, मालवाहतूक हिस्सा वाढविणं यावरही मंडळानं लक्ष केंद्रित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वेनं किसान रेल्वे सेवेच्या माध्यमातून असंख्य शेतकऱ्यांचा शेतमाल देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवला, २०२० -२१ या वर्षात देशभरातल्या ६ हजार ४० स्थानकांवर वायफायची सेवा स्थापित केली, तसंच १५६ उद्वाहनं आणि १२० स्वयंचलित जीने बसवली अशी माहिती त्यांनी दिली.

Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image