बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या मुंबईतल्या २ हजाराहून अधिक नागरिकांसाठी विशेष मोहीम

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या मुंबईतल्या २ हजाराहून अधिक नागरिकांसाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. मुंबईतल्या विविध बोगस लसीकरणांची सर्व प्रकरणे ही खाजगी आयोजने होती, यात २ हजार ५३ जणांना बोगस लस दिली गेली. त्यापैकी १ हजार ६३६ जणांची तपासणी केली आहे, त्यांच्यात कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत, पोलीसांनी मिळवलेल्या माहितीनुसार या सगळ्यांना खऱ्या लसीऐवजी सलाईनचे पाणी दिले गेल्याची माहिती पालिकेच्या वकीलांनी न्यायालयाला सादर केली. या सर्व नागरिकांची कोविन पोर्टलवर झालेली नोंदणी रद्द करावी, अशी विनंती केंद्र सरकारला केली असल्याची माहितीही त्यांनी उच्च न्यायालयाला दिली.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image