राज्यात १०वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात ९९ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिक्षण मंडळानं वार्ताहर परिषदेत आज ही माहिती दिली. दहावीच्या निकालात कोकणानं बाजी मारली असून, कोकण विभागाचा १०० टक्के निकाल लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. यंदा आठ माध्यमांतल्या ९ लाख ९ हजार ९३१ मुले, तर ७ लाख ७८ हजार ६९३ मुली अशा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत आयोजित केली होती. विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर केला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.