राज्यात १०वीच्या परीक्षेत ९९ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वीचा निकाल आज जाहीर झाला. त्यात ९९ पूर्णांक ९५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शिक्षण मंडळानं वार्ताहर परिषदेत आज ही माहिती दिली. दहावीच्या निकालात कोकणानं बाजी मारली असून, कोकण विभागाचा १०० टक्के निकाल लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. यंदा आठ माध्यमांतल्या ९ लाख ९ हजार ९३१ मुले, तर ७ लाख ७८ हजार ६९३ मुली अशा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत आयोजित केली होती. विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर केला आहे.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image