मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात काल २२८ रुग्ण कोरोना मुक्त झाले काल ७० नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात. १ हजार ६६ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल ३ रुग्णांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार ५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल एकही रुग्ण आढळला नाही. सध्या १० रुग्ण उपचार घेत आहेत. वाशिम जिल्ह्यात काल चार रुग्ण बरे होऊन घरी गेले काल जिल्ह्यात तीन नवीन रुग्ण आढळले. सध्या ३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात काल ६३१ रुग्णांनी कोरोना वर मात केली काल जिल्ह्यात. काल जिल्ह्यात २८२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आला. काल या आजारानं १३ रुग्णांचा बळी घेतला. नांदेड जिल्ह्यात काल बरे झालेल्या ३ रुग्णांना घरी पाठवलं काल २ नव्या रुग्णांची भर पडली. सध्या जिल्ह्यात ५० रुग्ण उपचाराधीन आहेत. परभणी जिल्ह्यात काल ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल जिल्ह्यात ५ रुग्णांना कोरोना ची लागण झाली सध्या ५० रुग्ण उपचार घेत आहेत
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.