राज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर किंचित खाली आला आहे.काल ७ हजार ३९१  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ८ हजार १० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १७० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ८९ हजार २५७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख २६ हजार ५६० रुग्ण दगावले.सध्या राज्यात १ लाख ७ हजार २०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६ पूर्णांक १७ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक ४ दशांश टक्के आहे.