राज्यात ५ हजार २१२ रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सहा हजार ८४३ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ६४ हजार ९२२ झाली आहे. काल १२३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३१ हजार ५५२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ०९ शतांश टक्के झाला आहे. काल ५ हजार २१२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ६० लाख ३५ हजार २९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ३३ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ९४ हजार ९८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.