प्रधानमंत्री पीक वीमा योजनेत राज्यातल्या शेतकऱ्यांना सहभागी होता यावं या साठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलै पर्यंत वाढवण्याची राज्य सरकारची केंद्राला विनंती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता यावं यासाठी अर्ज करण्याची मुदत येत्या २३ तारखेपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनानं आज केंद्राकडे पाठवला. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस असून आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र राज्याच्या काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे अनेक शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणन शक्य झालेलं नाही. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून मुदतवाढीचा प्रस्ताव आज केंद्र शासनाकडे पाठवला असल्याचं असं त्यांनी सांगितलं.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image