प्रधानमंत्री पीक वीमा योजनेत राज्यातल्या शेतकऱ्यांना सहभागी होता यावं या साठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलै पर्यंत वाढवण्याची राज्य सरकारची केंद्राला विनंती
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता यावं यासाठी अर्ज करण्याची मुदत येत्या २३ तारखेपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनानं आज केंद्राकडे पाठवला. कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली. पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस असून आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र राज्याच्या काही भागात लांबलेला पाऊस, कोरोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे अनेक शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणन शक्य झालेलं नाही. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून मुदतवाढीचा प्रस्ताव आज केंद्र शासनाकडे पाठवला असल्याचं असं त्यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.