मन की बात या कार्यक्रमातून प्रसारभारतीला मिळाला ३० कोटी ८० लाखांचा महसूल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमातून प्रसारभारतीला आतापर्यंत ३० कोटी ८० लाख रुपये महसूल मिळाला असल्याची माहिती आज सरकारने राज्यसभेत दिली.माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितलं की २०१४ मधे हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून २०१७-१८ या वर्षात १० कोटी ६४ लाख रुपयांची विक्रमी कमाई झाली आहे. तथापि या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट सरकारच्या दैनंदिन कामकाजाविषयी जनतेशी संवाद साधण्याचे आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.या कार्यक्रमाद्वारे जनतेलाही सूचना आणि आणि योगदान देण्याची संधी मिळते असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून २०१८ ते २०२० या काळात ६ कोटी ते १४ कोटी ३५ लाख श्रोत्यांनी तो ऐकल्याचं प्रसारण श्रोतृवर्ग संशोधन मंडळाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत दिसून आलं आहे. एकूण २३ भाषा आणि २९ बोलींमधे आकाशवाणीवरुन हा कार्यक्रम प्रसारित होतो. दूरदर्शनच्या विविध वाहिन्या तसंच खासगी दूरचित्रवाहिन्या त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध माध्यम मंचांवर मन की बात कार्यक्रम उपलब्ध असतो.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image