देशात लसीकरनाचा २५ कोटींचा टप्पा पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या २५ कोटीहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देत महत्वाचा टप्पा पार केला आहे. काल देशभरात ३१ लाख ६७ हजारांपेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या.

त्यामुळे ही संख्या एकूण २५ कोटी २८ लाखाच्या वर गेली आहे. त्यापैकी सुमारे ४ कोटी ८२ लाख नागरिकांना लसीच्या दोन्ही मात्रा दिल्यानं त्यांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून १४८ दिवसात भारतानं हा टप्पा ओलांडला आहे.

यात ४ कोटीपेक्षा जास्त मात्रा १८ ते ४५ वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image