रायगड जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधल्या श्रीगाव या गावात वादळामुळे पडलेल्या घरांच्या नुकसानीची आज केंद्रीय पथकाने पाहणी केली असून शासकीय अधिकाऱ्यांकडून एकूण झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. तसेच अलिबाग तालुक्यातील तळवडे या गावातील आंब्याच्या बागेतील नुकसानीची पाहणी ही पथकाने केली. वादळाने पडलेल्या आंब्याच्या कलमांची आणि शेतीचे  किती नुकसान झाले याची माहिती यावेळी पथकाने कृषी अधिकाऱ्यांकडून घेतली. त्या आधी काल पालघर जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाच सदस्यांच्या केंद्रीय समितीनं  काही गावांत जाऊन पाहणी केली होती.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image