CBSE आणि ICSE च्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचे निर्देश मागणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामरीच्या पार्श्वभूमीवर CBSE आणि ICSE च्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचे निर्देश मागणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर एकच वस्तुनिष्ठ स्वरुपाची परीक्षा घेतली जावी, आणि तिचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

न्यायमूर्ती अजय खानविलकर यांनी याचिका सुनावणीसाठी दाखल करुन घेतली आणि पुढची तारीख ३१ मे दिली आहे. दरम्यान १२ वीच्या परीक्षेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारने सर्व राज्यांकडून सूचना मागवल्या होत्या.

२५ मे पर्यंत राज्यांनी आपापलं म्हणणं केंद्रसरकारला कळवलं असून अंतिम निर्णय येत्या १ जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image