राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ९० टक्क्याच्या उंबरठ्यावर
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात रविवारी ५९ हजार ३१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, आतापर्यंत एकूण ४८ लाख २६ हजार ३७१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ पूर्णांक ७४ शतांश टक्के झालं आहे. सध्या राज्यात ४ लाख ६८ हजार १०९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रविवारी ३४ हजार ३८९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत करोनाबाधित झालेल्यांची एकूण संख्या ५३ लाख ७८ हजार ४५२ झाली आहे. रविवारी ९७४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या ८१ हजार ४८६ वर पोचली आहे. राज्यातला मृत्यूदर १ पूर्णांक ५२ शतांश टक्के आहे. आजपर्यंत तपासलेल्या ३ कोटी ११ लाख ३ हजार ९९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ पूर्णांक २९ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.