मृतदेहांवर अग्निसंस्कार करताना होणाऱ्या प्रदुषणावर अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं रुगणांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. स्मशानभूमीत मृतदेहांवर अग्निसंस्कार करताना धूर आणि राख मोठ्या प्रमाणात वातावरणात पसरत आहे.
हवा प्रदूषित होत असल्यानं स्मशानभूमी लगत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञाचा अवलंब करावा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
समशानभूमी परिसरातील या समस्येबाबत एका जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमुर्थी गिरीश कुलकर्णी यांनी मुंबईसह राज्यातल्या स्मशानभूमींसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, स्मशानभूमीतील चिमण्यांच्या उंची वाढवा असे आदेश न्यायालयाच्या खंडपीठानं पालिकांना दिले आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.