आपल्या नेतृत्वातल्या सरकारने केवळ सरकार म्हणून नाही तर, टीम इंडिया म्हणून काम गेल्याने, गेल्या ७ दशकांमधे न घडलेल्या गोष्टी ७ वर्षात घडू शकल्या - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या कार्यकाळाला आज ७ वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमीत्तानं, केंद्र सरकारनं देशाच्या विकासासाठी उचललेली पाऊलं, घेतलेले धोरणात्मक निर्णय, राबवलेल्या योजनांचा आढावा त्यांनी आजच्या मन की बातमधे घेतला. यामुळे लाभ झालेल्या, देशभरातल्या अनेक कुटुंबांच्या आशीर्वादामुळेच आपला देश सामर्थ्यानं, विकासाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं.आपण केवळ सरकार म्हणून काम करण्या ऐवजी टीम इंडिया म्हणून काम केल्यानं, गेल्या ७ दशकांमधे न घडलेल्या गोष्टी ७ वर्षात घडू शकल्या असं त्यांनी सांगितलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.