राज्य सरकारने लशींच्या तुटवड्यावरुन राजकारण करणं थांबवावं- रामदास आठवले
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने कोविड-१९ प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यावरुन राजकारण करणे थांबवावे असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना ते काल वार्ताहरांशी बोलत होते. केंद्राने आतापर्यंत सर्वात जास्त लशींचा पुरवठा महाराष्ट्रालाच केला आहे असे सांगून ते म्हणाले की सध्याची वेळ आपसांत दोषारोप करण्याची नसून एकजुटीने संकटाचा सामना करण्याची आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.