राज्य सरकारच्या उपाययोजनांचे प्रधानमंत्र्यांकडून कौतूक
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाविरुद्ध लढाईत राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि माहिती जाणून घेतली. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्य सरकार करत असलेल्या कामगिरीचं कौतूक केले. महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या नियोजनाची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना यावेळी दिली. प्रधानमंत्री आणि केंद्र सरकार कोरोना लढ्यात महाराष्ट्राला सुरुवातीपासून मार्गदर्शन करत आहेत. त्याचा राज्याला चांगला उपयोग होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्रानं मान्यही केल्या त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.