नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोविड प्रतिबंधक लसींच्या आतापर्यंत 21 कोटींच्यावर मात्रा दिल्या असून कोविड-19 लसीकरण कार्यक्रमातला मोठा टप्पा पार केला आहे. कोरोनाच्या साथीचा प्रतिबंध आणि तिचं व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीनं सरकारनं सर्वंकष धोरण आखलं असून चाचण्या, संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, आणि कोविड प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन यासोबतच लसीकरण हा देखील या धोरणाचा मुख्य आधारस्तंभ असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
काल दिवसभरात 28,09,000 हून जास्त लाभार्थींना लसींच्या मात्रा देण्यात आल्या. यापैकी जवळपास 25,11,000 लाभार्थींना पहिली तर सुमारे तीन लाख लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. काल 18 ते 44 वर्षे वयोगटातल्या 14,15,000 लाभार्थींना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. लसीकरण अभियानाचा 3 रा टप्पा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 82 लाखांच्या वर लाभार्थींना लसीची पहिली मात्रा टोचण्यात आली आहे, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.