वर्ध्यात प्रति दिवस ४० हजार रेमेडमसेवीर इंजेक्शन निर्मिती करणारा प्रकल्प सुरु

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात रेमेडमसेवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वर्ध्यात ४० हजार इंजेक्शन प्रति दिवस निर्मिती करणारा प्रकल्प सुरु केला आहे, अशी माहिती केद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी दिली. ते काल नागपूर इथं व्हडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून बोलत होते.

नागपूर शहरात वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प सुरू केल्याचं ते म्हणाले.

विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना इंजेक्शनचा पुरवठा करायला आधी प्राधान्य असेल, त्या नंतर राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यांना याचं वितरण केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

विविध उद्योग समूहाकडून अशा संकटसमयी निधीची आवश्यकता असून, त्यासाठी उद्योगांनी पुढे यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

नागपूर इथं कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन करत असलेल्या कामांची त्यांनी माहितीही दिली. यावेळी महपौर दयाशंकर तिवारी हे देखील उपस्थित होते.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image