मुंबईत लोकांच्या हिताचा विचार करुनच निर्बंध कडक करणार- किशोरी पेडणेकर
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं निर्बंध आणखी कडक केले जाणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊन किंवा अंशतः लॉकडाऊन लागू होण्याच्या शक्यतेबद्दल त्यांनी सांगितल की, लोकांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले जातील. बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना वाढत असून त्याचा आरोग्य सेवेवर ताण येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात आज संध्याकाळी मुख्यमंत्री योग्य त्या सूचना देणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.