कुंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू-महंताना १४ दिवस गृह विलगीकरण ठेवावं- त्रंबकेश्वर नगरपालिका

 

मुंबई (वृत्तसंस्था) : हरिद्वार इथं कुंभमेळ्यासाठी जाऊन आलेल्या साधू-महंताना चौदा दिवस गृह विलगीकरण ठेवावं यासाठी त्रंबकेश्वर नगरपालिकेनं दहा आखड्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

त्रंबकेश्वर इथं दहा शैव आखाडे आणि अनेक आश्रम असून त्यातले अनेक साधू-महंत हरिद्वारला कुंभमेळ्यासाठी गेले होते. त्यांची यादी त्रंबकेश्वर नगरपालिकेनं मागवली आहे. परतलेल्या साधूंनी आधी कोविड चाचणी करावी, आणि नंतर गृह विलगिकरणात राहावं, असं न करता ते रस्त्यावर फिरताना आढळले तर कारवाई करण्याचा इशारा नगरपालिकेनं दिला आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image