टाळेबंदीनंतर राज्य सरकार नागरिकांना कशी मदत करणार ते राज्यसरकारनं स्पष्ट करावं- देवेंद्र फडनवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं टाळेबंदी केलीच तर त्या काळात नागरिकांना कशा पद्धतीनं मदत केली जाईल, तेही स्पष्ट करावं. अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली. ते काल  नागपूरमध्ये बातमीदारांशी बोलत होते. विविध देशांनी टाळेबंदी केली तेव्हा देशवासियांना आर्थिक मदत देऊ केली.

केंद्र सरकारनंही नागरिकांना २० लाख कोटींचं पॅकेज दिलं होत, मात्र महाराष्ट्र सरकारनं एक पैसाही नागरिकांना मदतीसाठी दिलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. लोकांच्या मदतीसाठी आम्ही गेले वर्षभर रस्त्यावर आहोत आणि यापुढेही तेच करू, असं ते म्हणाले.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image