राज्यात सोमवारी ७१ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल आजवरचे सर्वाधिक ७१ हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठी घट होऊन ५० हजारापेक्षा कमी म्हणजेच ४८ हजार ७०० रुग्णांची नोंद झाली, तर ५२४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ४३ लाख ४३ हजार ७२७ झाली आहे. यापैकी  एकूण ३६ लाख १ हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर कोरोनाबळींची एकूण संख्या ६५ हजार २८४ वर पोचली आहे.

राज्याच्या कोरोनामुक्ती दरात वाढ होऊन तो ८२ पूर्णांक ९२ शतांश टक्क्यावर पोचला आहे, तर कोरोना मृत्यू दर दीड टक्क्यावर खाली आहे. सध्या राज्यभरात  ६ लाख ७४ हजार ७७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image