राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेनं काल नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांनुसार शहरातल्या सर्व समुद्र किनाऱ्यांवर  ३० एप्रिल पर्यंत प्रवेश बंदी राहाणार आहे. त्याचप्रमाणे ज्या इमारतींमध्ये एकाच वेळेस पाच पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास त्या निवासी सोसायटीला १० हजार रुपये दंडही लावण्यात येणार आहे. लागोपाठ हे घडल्यास सोसायटीला २० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

गृहविलगीकरणात असलेले रुग्ण बाहेर फिरतांना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येणार असून  परदेशातून येणाऱ्या नागरिकांना ७ दिवसांचे संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. अनेक जण विलगीकरणातून पलायन करत असल्याचे आढळून आल्यामुळे महानगर पालिकेने या सूचना जारी केल्या आहेत. या सूचना त्वरित अंमलात येणार आहेत असंही महानगरपालिकच्या वतीने सांगण्यात आलं आहे.  

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image