कृषी, कामगार, नागरिकत्व कायद्यांबाबात अपप्रचार केला जात असून राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट आहे, प्रधानमंत्र्यांचा टोला
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे, कामगार कायदे, नागरिकत्व कायदा इत्यादींबाबत अपप्रचार केला जात असून राजकीय अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज भाजपाच्या ४१ व्या स्थापनादिनानिमित्त बोलत होते.
लोकांच्या जमिनी हिरावून घेतल्या जातील, नागरिकत्व हिरावून घेतलं जाईल, असा प्रचार केला जातो मात्र तो पूर्णपणे खोटा आहे, असं ते म्हणाले. याबाबत लोकांमधे जाऊन जागृती करण्याचं आवाहन त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना केलं. भाजपा केवळ राष्ट्रीय हिताचंच नव्हे प्रादेशिक आकांक्षांचंही प्रतिनिधित्व करते. व्यक्ती पेक्षा पक्ष मोठा, पक्षापेक्षा देश मोठा हा भाजपाचा मंत्र आहे, असं मोदी यांनी सांगितलं. भाजपाच्या विजयावर टीका करणाऱ्या लोकांना भारताची राज्यघटना आणि लोकशाहीची परिपक्वता समजलेली नाही अशी, टीका त्यांनी केली. भाजपा हे जिकंणारं यंत्र आहे, हे खरं आहे मात्र ही चळवळ लोकांशी जोडलेली आहे, असंही मोदी म्हणाले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.