गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे संसदेत पडसाद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद आज संसदेत उमटले. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये खंडणी गोळा करायला सांगितलं होतं असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

यासाठी आज राज्यसभेत भाजपा सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. देशमुख यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी भाजपा सदस्य करत होते. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.

खंडणी उकळण्यामधे मुंबई पोलीस कसे गुंतले आहेत. हे साऱ्या देशानं पाहिलं असेली ही गंभीर बाब आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. लोकसभेतही या मुद्यावरुन गदारोळ झाला. याप्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी भाजपा सदस्यांनी केली.

हा महाराष्ट्र सरकारचा मोठा घोटाळा आहे असा आरोप भाजपा खासदार कपिल पाटील यांनी केला. त्यावर प्रत्त्युत्तर देताना, राज्यातलं सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपानं अनेक प्रयत्न केले असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला.

देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निष्ठेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर भाजपा आणि शिवसेना सदस्यांमधे जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले.

त्याआधी प्रश्नोत्तराच्या तासात सीएसआर निधीबाबतच्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, की महाराष्ट्रात खंडणीखोरी सुरु असून ही गंभीर बाब आहे.

सीएसरआर अर्थात, कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या ७२ हजार कोटी रुपयांपैकी सुमारे १२ हजार ७०० कोटी रुपयांचा सर्वात मोठा वाटा महाराष्ट्राला मिळाला आहे, अशी माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली.

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image