राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी रिपब्लिकन पक्षाची राज्यपालांकडे मागणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालच्या रिपब्लिकन पक्षानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिलं. त्यानंतर पक्षाचे नेते अविनाश महातेकर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली.

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं असून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत लोकांचा विश्वास उडाला आहे, असं या निवेदनात म्हटलं असल्याचं महातेकर यांनी सांगितलं.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image