राज्यात काल एकाच दिवसात ४० हजार ४१४ नव्या रुग्णांची नोंद
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड प्रार्दुभाव झपाटयानं वाढत असून, काल एकाच दिवसात ४० हजार ४१४ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या २७ लाख १३ हजार ८७५ वर पोचली आहे. राज्यात काल १०८ रुग्णांचा मृत्यू झाला.
सध्या राज्यातला मृत्यूदर २ टक्क्यावर आला आहे. काल १७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत एकूण २३ लाख ३२ हजार ४५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८५ पूर्णांक ९५ शतांश टक्के झालं आहे.
सध्या राज्यात ३ लाख २५ हजार ९०१ सक्रीय रुग्ण असून त्याच्यांवर उपचार सुरु आहेत आजपर्यंत तपासलेल्या १ कोटी ९३ लाख ५८ हजार ३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७ लाख १३ हजार ८७५, म्हणजे १४ पूर्णांक २ शतांश टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात १५ लाख ५६ हजार ४७६ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत, तर १५ हजार ८५२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.