राज्यात काल १४ हजार ५२३ रुग्णांची कोरोनावर मात;३५ हजार ७२६ नव्या रुग्णांची नोंद
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १४ हजार ५२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २३ लाख १४ हजार ५७९ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८६ पूर्णांक ५८ शतांश टक्के झालं आहे. काल ३५ हजार ७२६ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या २६ लाख ७३ हजार ४६१ झाली आहे. सध्या राज्यभरात तीन लाख तीन हजार ४७५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल १६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५४ हजार ७३ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.