विधानसभा बरखास्त न करता राज्यात काही दिवस राष्ट्रपती राजवट लागू करण्याची प्रकाश आंबेडकर यांची राज्यपालांकडे मागणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विधानसभा बरखास्त न करता राज्यात काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. या संदर्भातलं निवेदन त्यांनी आज राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलं.

राज्यापालांनी या बाबतीतला अहवाल त्वरीत राष्ट्रपतींना पाठवावा, असंही ते म्हणाले. राज्यात काही चांगले आमदार आहेत, त्य़ामुळे विधानसभा बरखास्त करू नये, राष्ट्रपती राजवट लागू झाल्य़ानंतर विधानसभेतल्या गुन्हेगारांना शिक्षा होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image