राज्यातल्या जिल्हा नियोजन समित्यांसाठी ३०० कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर ‘आव्हान निधी’ राखीव

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व जिल्हा नियोजन समित्यांची कामगिरी प्रभावी आणि उत्कृष्ट करण्यासाठी, पुढील वर्षापासून ३०० कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर ‘आव्हान निधी’ राखीव ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. याबरोबरच जिल्हा नियोजन समित्यांकडून ‘आय-पास’ संगणकप्रणालीचा शंभर टक्के वापर, निधीचा वेळेत विनियोग, आढावा बैठकींचे नियमित आयोजन आदी निकषांवर उत्कृष्ट ठरणाऱ्या महसूल विभागातल्या एका जिल्ह्याला, पन्नास कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी पुढील वर्षापासून देण्यात येणार आहे.

जिल्हा नियोजन आराखड्यातील तीन टक्के निधी महिला, बालविकासाच्या योजनांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यासाठी जिल्ह्यांना दिलेला अखर्चित निधी, सार्वजनिक आरोग्य सेवांवर खर्च करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Popular posts
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image