भारत आणि पाकिस्तान दरम्यान नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेकडून स्वागत
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या नियंत्रण रेषा आणि इतर भागातील युद्धविराम कराराचे संयुक्त राष्ट्र सभेचे अध्यक्ष वोल्कन बोझ्कीर यांनी स्वागत केले आहे.
दोन्ही देशांनी शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आपापसातले प्रश्न सोडवण्यासाठी केलेला हा करार अन्य देशांसाठी सामंजस्याचे उदाहरण ठरेल असे बोझ्कीर यांनी म्हटले आहे. या करारामुळे संयुक्त राष्ट्र सभेची मूल्य अधोरेखित होतात असेही त्यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे.
थेट संपर्कासाठीची यंत्रणा सुरू करण्याच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांत चर्चा झाल्याचे भारत आणि पाकिस्तानने काल जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
सीमाभागात शांतता राखली जावी, यासाठी हिंसाचाराला उद्युक्त करणाऱ्या वादाच्या विषयांवर चर्चेने तोडगा काढण्यावर तसेच सीमारेषेवर शस्त्रसंधीसह अन्य करारांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.