समुद्रावर उपजीविका असणाऱ्या कोळी बांधवाच्या समस्यांचाही विचार करावा- राज्यपाल
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विद्यापीठानं समुद्राच्या विविध पैलूंचा शास्त्रीय पद्धतीनं सर्वंकष अभ्यास करावा, तसंच समुद्र विज्ञानातल्या देशाच्या समृद्ध वारशाचंही पुनरुज्जीवन करावं, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई विद्यापीठानं स्थापन केलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन मरीटाईम स्टडीज’चं उद्घाटन राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत काल झालं, त्यावेळी ते बोलत होते.
या सागरी अध्ययन केंद्रानं समुद्राचा एकात्मिक अभ्यास करताना, समुद्रावर उपजीविका असणाऱ्या कोळी बांधवाच्या समस्यांचाही विचार करावा, तसंच येऊ घातलेल्या वादळांची योग्य पूर्वसूचना देण्याच्या दृष्टीनं हवामान खात्यासोबत सहकार्य प्रस्थापित करावं, असं राज्यपालांनी सांगितलं.
उद्घाटन सोहळ्याला नौदल प्रमुख अॅंडमिरल करमबीर सिंग, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे संचालक डॉ. शेखर मांडे, कुलगुरू सुहास पेडणेकर, तसंच केंद्राच्या प्रभारी संचालक अनुराधा मुजूमदार उपस्थित होत्या.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.